عَنْ عَبْدِ اللَّهِ بْنِ عُمَرَ رَضيَ اللهُ عنهما:
سَأَلَ رَجُلٌ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ وَهُوَ عَلَى المِنْبَرِ، مَا تَرَى فِي صَلاَةِ اللَّيْلِ، قَالَ: «مَثْنَى مَثْنَى، فَإِذَا خَشِيَ الصُّبْحَ صَلَّى وَاحِدَةً، فَأَوْتَرَتْ لَهُ مَا صَلَّى» وَإِنَّهُ كَانَ يَقُولُ: «اجْعَلُوا آخِرَ صَلاَتِكُمْ وِتْرًا» فَإِنَّ النَّبِيَّ صَلَّى اللهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ أَمَرَ بِهِ.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري: 472]
المزيــد ...

या भाषांतराला अधिक पुनरावलोकन आणि छाननीची आवश्यकता आहे.

हजरत अब्दुल्ला बिन उमर रजिअल्लाहु अनहु वर्णन करतात की:
जेव्हा प्रेषित अल्लाह ची सलामती असो त्यांच्यावर मेंम्बरवर लोकांना संबोधित करत होते, त्यावेळी एका व्यक्तीने प्रश्न केला की, रात्री च्या नमाज बाबत तुमचं काय मत आहे, त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले की:<<दोन दोन रकाअत ने नमाज अदा करा, आणी जर तुम्हाला सकाळ ची शंका वाटली तर एक रकाअत अदा करावी, ती एक रकाअत तुमच्या सर्व नमाज ला वितर (विषम) बनवते>> प्रेषित सलामती असो त्यांच्यावर सांगत असत की:<<आपल्या रात्रीची शेवटची नमाज वितर ला बनवा>> कारण प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर तसा आदेश दिला आहे.

[صحيح] - [متفق عليه] - [صحيح البخاري - 472]

स्पष्टीकरण

एका व्यक्तीने प्रेषितांना सलामती असो त्यांच्यावर मेंम्बरवर असतांना सवाल केला, हे अल्लाह च्या प्रेषिता मला रात्री ला नमाज अदा करण्याची पद्धत सांगा? त्यावर प्रेषितांनी सलामती असो त्यांच्यावर फरमाविले:तुम्ही दोन दोन रकाअत नमाज अदा करावे, दर दोन रकाअत वर सलाम करावा, जर तुम्हाला दिवस उजाडण्याची भिती कसली तर मात्र तुम्ही एक रकाअत नमाज अदा करावी, ती तुमच्या सर्व नमाज ला वितर (विषम) बनवुन देईल, प्रेषित सलामती असो त्यांच्यावर नेहमी सांगत असत की तुमची रात्र ची शेवटची नमाज वितर असावी.

हदिसचे फायदे

  1. रात्रीच्या नमाज ची पद्धत अशी आहे की, वितरण वगळता दर दोन रकाअत नंतर सलाम द्वारा नमाज समाप्त करावी.
  2. रात्रीला नमाज ची संख्या मर्यादित नाही, कारण हदिस वरुन स्पष्ट होते.
  3. इमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:"रात्री ला व दिवसात सुद्धा नमाज दोन दोन रकाअत ने अदा करावी", सदर हदिस आपणाला सविस्तर माहिती देते की, दर दोन रकाअत वर सलाम द्वारा नमाज समाप्त करावी, अर्थात रात्री व‌ दिवसाच्या संपूर्ण (ऐच्छिक) नफील नमाज दोन दोन रकाअत ने अदा करावी, म्हणजे दिवस रात्री नफील नमाज दोन दोन रकाअत नंतर सलाम करणे पसंदप्राप्त आहे.
  4. ईमाम नववी रहमतुल्लाह सांगतात की:प्रेषितांची सलामती असो त्यांच्यावर सुन्नत पद्धत ही आहे की, वितर ला शेवटची नमाज बनवावे, आणी वितर ची वेळ फज्र (सकाळच्या) च्या प्रारंभाने समाप्त होतो, शाफयी पंथी सुद्धा यावर आचरण करतात, तसेच सर्वं विद्वानांचं सुद्धा यावर एकमत आहे.
भाषांतरे दाखवा
भाषा: الإنجليزية الأوردية الإسبانية अधिक (34)