عَنْ أَبِي الدَّرْدَاءِ رَضِيَ اللَّهُ عَنْهُ قَالَ: قَالَ رَسُولُ اللهِ صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ:
«أَلاَ أُخْبِرُكُمْ بِأَفْضَلَ مِنْ دَرَجَةِ الصِّيَامِ وَالصَّلاَةِ وَالصَّدَقَةِ؟» قَالُوا: بَلَى، قَالَ: «صَلاَحُ ذَاتِ البَيْنِ، فَإِنَّ فَسَادَ ذَاتِ البَيْنِ هِيَ الحَالِقَةُ».
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي] - [سنن الترمذي: 2509]
المزيــد ...
हजरत अबु दरदा रजिअल्लाहु अनहु कथन करतात की प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले आहे की:
<<काय मी तुम्हाला रोजा, नमाज, आणी दानधर्मा पेक्षा चांगले सत्कर्म न सांगु?>>
सहाबा रजिअल्लाहु अनहु उत्तरले:का नाही! हे प्रेषिता!
प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम फरमाविले:<<लोकांच्या दरम्यान समेट घडवुन आणणे, कारण आपसा-आपसातील मतभेदांमुळे एकप्रकारे संबंधाचे मुंडणच होते>>.
[صحيح] - [رواه أبو داود والترمذي] - [سنن الترمذي - 2509]
पैगंबरांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम आपल्या सोबत्यांना प्रश्नाद्वारे विचारणा केली:काय मी तुम्हांला रोजा, नमाज, व दानधर्म या नफली (शिल्लक) उपासने पेक्षा जास्त मोठे सत्कर्म न दाखवु? जेव्हा सगळ्यांनी मोठ्या उत्कंठेने होकार दिला. तेव्हा प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम स्पष्ट केले: लोकांच्या दरम्यान समेट (सुलह) घडवून आणने, सर्वात उच्चतम सत्कर्म आहे, कारण आप-आपसातील वादविवाद, भांडणामुळे, द्वेष, मत्सर व मानवा मानवात दरी निर्माण होते, आणी आपापसातील मतभेद, संबंधाची खराबी त्यांच्या दिन धर्म, दोघांनाही नुकसान पोहचवत, ज्याप्रमाणे वस्तरा केसांना मुळासकट समुळ (नष्ट) मुंडन करतो, म्हणुनच प्रेषितांनी सल्लल्लाहु अलैही व सल्लम याला मुंडन करणारं कर्म म्हटले आहे, अर्थात यामुळे माणसाचा दिनधर्मच मुळासकट समाप्त होतो.